https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : September 2020
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Tuesday, September 29, 2020

ओबीसी वर्गीकरणाच्या न्या.रोहिणी आयोगाला वेळोवेळी मुदत वाढ का ?

 ओबीसी वर्गीकरणाच्या  न्या.रोहिणी आयोगाला वेळोवेळी मुदत वाढ का ?  डॉ. बालासाहेब किलचे गोरेगावकर

9404021375



भारतीय राजकारणात ओबीसी व ओबीसी आरक्षणाचे प्रकरण नेहमीच अत्यंत संवेदनशील राहिले आहे.त्यामुळे नेहमीच  सत्ताधारी वर्ग ओबीसी प्रवर्गाला  कसे वापरून घ्यायचे  याचाच वेळोवेळी विचार करताना आपल्याला दिसून येते.३० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा आधार घेत इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आणि केंद्र सरकार चालवत असलेल्या आस्थापनांतील नोकर्‍यांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर केले.ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर अनेक सामाजिक,राजकीय घटक पुढे आले, त्यातून त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास हा काही प्रमाणात झाला ही वस्तुस्थिती जरी असली तरीसुद्धा या ओबीसी प्रवर्गातील जातींची संख्या पाहता ज्या जाती लोकसंख्येने अधिक व प्रभावी आहेत आहेत याच जातींना  राजकीय आरक्षणाचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला हे ही वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे ज्यां ओबीसींना खरंच आरक्षणाची गरज आहे त्या ओबीसीपर्यंत आरक्षण पोहोचले का? हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो तर त्याचे उत्तर नकारात्मक स्वरूपात आपल्या पुढे येतं.त्यातूनच ओबीसीची लोकसंख्या व जातीची संख्या पाहता त्याची व आरक्षणाचे वर्गीकरण करावे   हा विचार पुढे येऊ लागला आणि त्यातूनच 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ह्या वर्गीकरणाला पाठबळ देण्यासाठी एक आयोग स्थापन केला, मुळातच ही संकल्पना अतिशय चांगली असतानाही या आयोगाला सरकारकडून वेळोवेळी मुदतवाढ दिली जात आहे, त्यामुळे या आयोगाच्या अहवाल शासनापर्यंत लवकर येत नाही ही वस्तुस्थिती आहे ह्याचाही विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त ठरतं, म्हणून या आयोगाची पार्श्वभूमी आणि रूपरेषा पाहता या आयोगाच्या अहवालाच्या येणाऱ्या शिफारशीचा आणि अंमलबजावणीचा भारतीय राजकारणावर व ओबीसीवर काय परिणाम होणार आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करू.

   दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसीतील सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी व ओबीसी जातींचे पोट-वर्गात वर्गीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसींचे 27 टक्के आरक्षण विविध उपश्रेणींमध्ये कसे वितरित करावे आणि तसे करणे आवश्यक आहे की नाही हे सुचवण्यासाठी 02 ऑक्टोबर 2017 ला आयोगाची स्थापना केली आहे.या आयोगामध्ये चार सदस्याची नियुक्ती केली आहे.त्यामध्ये,G. Rohini, Chief Justice (Retd.), Delhi High CourtDr.J.K.Bajaj, Director, Centre for Policy Studies,New Delhi,Director, Anthropological Survey of India, Kolkata(ex-officio Member) ,Registrar General and Census Commissioner, India. (ex-officio Member).न्यायमूर्ती रोहिणी व्यतिरिक्त सेंटर आँफ पॉलिसी  स्टडीज दिल्लीचे संचालक डॉ. जे. के. बजाज, मानववंश सर्वेक्षण कलकत्ताचे संचालक आणि प्रंबधक आणि जनगणना आयुक्त असतील.


 न्या.रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील हा आयोग ओबीसींच्या वर्गीकरणावर विचार करेल

(i) To examine the extent of inequitable distribution of benefits of reservation among the castes or communities included in the broad category of Other Backward Classes with reference to such classes included in the Central List;

(ii) To work out the mechanism, criteria, norms and parameters in a scientific approach for sub-categorisation within such Other Backward Classes; and

(iii) To take up the exercise of identifying the respective castes or communities or sub-castes or synonyms in the Central List of Other Backward Classes and classifying them into their respective sub-

  पदभार स्वीकारल्यानंतर 12 आठवड्यांच्या आत आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करावा. आयोगाच्या शिफारशीनंतर, केंद्र सरकार हे सुनिश्चित करेल की आरक्षणाचा लाभ इतर मागास प्रवर्गातील सर्व जातींना समान स्वरूपात  कसे मिळेल.नव्याने तयार झालेल्या आयोग प्रामुख्याने  पुढील बाबतीत अभ्यास करेल त्यामध्ये ओबीसीमध्ये केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जातींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षणाचा योग्य प्रमाणात फायदा मिळतो का, फायदा योग्य प्रमाणात नसल्यास त्यांचे वर्गीकरण कसे केले जाईल? हे वर्गीकरण करताना मागासवर्ग आयोगाने  तीन वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याचे मार्ग सुचविले आहेत त्यामध्ये मागासलेला वर्ग, जो अधिक मागासलेला आहे, जो  अती मागासलेला आहे. ह्याचा विचार करून  जातींची संख्या आणि मागासलेपणा लक्षात घेऊन हा आयोग नवीन यादी तयार करेल. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि झारखंडसह दहा राज्यांमध्ये आधीच अशी व्यवस्था अमलात  आहे.  आता ती व्यवस्था  केंद्रीय यादीमध्ये येईल.ओबीसीचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करणं ही चांगली संकल्पना आहे,म्हणूनच आयोगाने 2018 मध्येच या विषयावर आपल्या शिफारशी तयार केल्या होत्या, परंतु देशातील गलिच्छ राजकारणाच्या चक्रात ही संकल्पना अडकल्याचे दिसून येते कारण आयोगाच्या शिफारशींच्या मोठा स्फोट होऊ इच्छितो हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आतापर्यंत या आयोगाला नऊ वेळा वेळोवेळी मुदतवाढ देऊन आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात चालढकल केल्याचे दिसून येते. त्यामुळे आज ओबीसी समाजात जागृती होणे गरजेचे आहे.

भारतातील उच्च जातीच्या हिंदूंच्या तुलनेत ओबीसी या समुदायांचे सामाजिक आणि शैक्षणिक,राजकीय मागासलेपण हे लक्षात येण्याजोगे आहे.आज  ओबीसींच्या केंद्रीय यादीमध्ये जवळपास 4000 जाती व उप-जाती या प्रवर्गात येतात.ह्या चार हजार जातीचे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केल्या जात त्यामध्ये त्यामध्ये हिंदी पट्ट्यातील जाट, यादव, कुर्मी कर्नाटकातील ओक्कालिंग महाराष्ट्रातील कुणबी, दुसऱ्या वर्गात कमी प्रमाणात शेत जमीन असलेला शेतकरी वर्ग,तिसरी वर्गात विणकर, लोहार, सुतार आणि इतर हस्तकलेसारख्या कारागीर जातींमध्ये गुंतलेल्या समावेश होतो चौथा वर्गात पारंपरिकरित्या धोबी,न्हावी, गायक इत्यादी सारख्या जाती तसेच  भटक्या जमाती आणि भिक्षा मागणे किंवा गुन्हेगारी असे पारंपारिकपणे वागणार्‍या समजाचाही समावेश ह्या प्रवर्गांत समावेश होतो.

   ओबीसीच्या प्रवर्गांत एकीकडे जाट, यादव, कुर्मी, कुणबी आणि ओक्कालिंग सारख्या बर्‍याच समृद्ध जाती आहेत तर दुसरीकडे धोबी, न्हावी आणि भटक्या जाती अत्यंत वंचित स्थितीत राहतात. तसेच ओबीसी वर्गात अशा काही जाती आहेत ज्यांचे सदस्य उच्च जातीतील लोकांच्या अगदी मागे आहेत तर काही जाती अशा आहेत की त्यांना अस्पृश्य  समाजातही त्यांच्याकडे अत्यंत खालच्या दर्जाचे म्हणून पाहिल्या जाते.आज ओबीसी प्रवर्गात  मोठ्या प्रमाणात असमानता असुनही सोयीच्या कारणास्तव ओबीसींना एकत्र नांदवले जाते.आजपर्यंत आर्थिक सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या पुढारलेल्या समाजाच्या भीतीमुळे वेगवेगळ्या वर्गातील समाजांनी एकत्र यायला पाहिजे हा विचार सर्वांनी पुढे रेटून नेलेला आहे. त्यामुळे निवडणुकीत हा समाज एक गठ्ठा मतदान करताना  दिसतो. आज ओबीसी प्रवर्गातील रचना पाहता या ठिकाणी संधी व स्पर्धेचे स्वरूप पाहता ही सारख्या स्वरूपाची राहिली नाही. म्हणूनच एकंदरीतच ओबीसीची मांडणी ही सोयीस्कर व योग्यरीत्या नाही ही वस्तुस्थिती आहे.म्हणून ओबीसींचे वर्गीकरण होणे काळाची गरज आहे. एकंदरितच ओबीसीच्या वर्गीकरणातून ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडली जाते ही टीका या वर्गीकरणावर केल्या जाते, परंतु या टिके मागे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात राजकारण आहे हे प्रथम आपण सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून आज ओबीसींची परिस्थिती पाहता आयोग नेमण्याची भूमिका ही सकारात्मक स्वरूपाची असल्याचे आपल्याला दिसून येते. 

कारण ओबीसी प्रवर्गातील 27 टक्के आरक्षणाचे तीन श्रेणीत विभागणी विभाजन करून ज्यांना आवश्यकता आहे तेवढं आरक्षण दिलं तर ओबीसींना समसमान न्याय मिळेल.त्यासाठी लागणारी कायदेशीरबाब ही अत्यंत सोपी आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने इदिरा साहाणी खटल्यात या विचाराला मान्यता दिलेली आहे. म्हणून इतर आरक्षणात जश्या कायदेशीर अडचणी आहेत तशा या वर्गीकरणामध्ये कोणतीही कायदेशीर अडचणी नाहीत केवळ राजकीयदृष्ट्या  व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हे वर्गीकरण अडवल्या जाताना दिसून येते. कारण ओबीसी प्रवर्गाचा ज्या घटकांना पाठिंबा मिळतो तो घटक सत्ताधारी बनतो ही वस्तुस्थिती आहे. पण ओबीसीचा संपूर्ण पाठिंबा हा कोणत्याही एका राजकीय पक्षाला मिळत नाही. सध्याच्या राजकीय प्रक्रियेचे स्वरूप जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा जो काही जनमताचा आधार होता तो जनमताचा आधार हा दलित, ओबीसी हा होता, त्यापैकी ओबीसी प्रवर्ग हा आता मोठ्या प्रमाणात भाजपकडे आहे,  पण तरीसुद्धा त्या ओबीसीमधला  जो प्रभावी गट आहे तो गट भाजपकडे गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ओबीसी मधले सर्व लहान गट पूर्णतः आपल्याकडे वळवून घेण्याचा सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप आपल्याकडे जो ओबीसीचा प्रवर्ग वळलेला आहे त्या प्रवर्गाला तुटू देऊ इच्छित नाही आणि त्यामुळे वेळोवेळी न्या.रोहिणी आयोगास मुदतवाढ देण्यात येते. एकंदरीतच संपूर्ण ओबीसी प्रक्रियेच्या वर्गीकरणाची प्रक्रिया पाहता ती आज गलिच्छ राजकारणात अडकल्यामुळे या आयोगाचा अहवाल कधी येईल हे नक्की सांगता येणार नाही.

एकंदरीतच न्या.रोहिणी आयोगाची कार्यकक्षा आणि त्यांचा येणारा अहवाल पाहता तसेच त्यांला दिली जाणारी वेळोवेळी मुदतवाढ पाहता ओबीसींच्या सामाजिक संघटनांनी सामाजिक व राजकीय दबावाचा वापर करून सरकारला न्या. रोहिणी आयोगाचा अहवाल स्वीकारून त्या शिफारशी लवकरात लवकर लागू कराव्यात यासाठी ओबीसींनी जागृत होणे गरजेचे आहे. कारण आयोगाला वेळोवेळी मुदतवाढ देऊन सरकार ओबीसी राजकारणाचे समीकरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीत आहे.  एकंदरीतच  ओबीसीचे वर्गीकरण करणे  हा एक चांगला व सकारात्मक निर्णय आहे व त्यामुळे ओबीसीतील  ज्या लोकांना आरक्षणाची खरंच गरज आहे त्या पर्यंत आरक्षण पोहोचेल  ही वस्तुस्थिती आहे. ओबीसीचे वर्गीकरण राजकीयदृष्ट्या आपल्याला कसे महाग पडेल  ह्याचा विचार करून  केंद्र सरकार वेळोवेळी चालढकल करताना दिसते,  त्यातुनच न्या. रोहिणी आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि त्याची अंमलबजावणी जर झाली तर त्याचा फटका आपल्याला बसेल त्यामुळे न्या. रोहिणी आयोग राजकीय चौकटीत अडकवल्या गेला आहे.एकदरित न्या.रोहिणी आयोगाच्या आवाहालाचा परिणाम देशातील ओबीसी राजकारणाची दिशा आणि स्थिती बदलण्यास नक्कीच हातभार लावणारा असेल यात शंका नाही.


 ( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)

Reference:


https://loksabha.nic.in/Members/QResult16.aspx?qref=64382


https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1575533


https://m.economictimes.com/news/politics-and-nation/rohini-commission-set-to-get-nod-for-its-ninth-extension/articleshow/76544439.cms


https://www.jagranjosh.com/current-affairs/justice-rohini-commission-gets-6-month-extension-till-january-2021-1593068862-1


https://hindi.theprint.in/opinion/from-mandal-to-modi-govt-rohini-commission-report-on-obc-is-trapped-in-bad-politics/154880/


https://www.bbc.com/hindi/india-39886426






 

 








Sunday, September 27, 2020

धनगर आरक्षणाचा बिगूल वाजला…...

धनगर आरक्षणाचा बिगूल वाजला…...

डॉ. बालासाहेब किलचे गोरेगावकर

9404021375


राज्यात एकीकडे मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन पेटलं असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा ही प्रश्न कायम आहे.या समाजाने देखील हा प्रश्न वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला असताना ही मात्र आता पर्यंत पदरी फक्त आश्वासने आणि निराशा होऊनही आपला राजकीय स्वार्थ साधुन धनगर समाजाचे नेतृत्व पुन्हा एकदा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे.धनगर आंदोलनाची नवी सुरुवात ढोल बजाओ, सरकार जगाओ ह्या आंदोलनाने होऊन, धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण द्या  ह्या मागणीची आठवण करून देण्याचे काम हे आंदोलन करणार आहे.एकदरित धनगर समाजाकडे पाहताना  मेढपाळाचा व  काही प्रमाणात शेती व्यवसाय करणारा  हा समाज आहे.महाराष्ट्रातील विठ्ठल, खंडोबा, जोतिबा, बिरोबा,मायाक्का ही दैवते या समाजाने दिलेली देणगी म्हणावी लागेल. या समाजातून चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन ही घराणी जशी राज्यकर्ते म्हणून पुढे आली तसेच मध्ययुगात मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर ते आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराजा यशवंतराव होळकर व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर पुढे आले असले तरीही आधुनिक लोकशाही व्यवस्थेत या समाजाचे अनेक नेते पुढे आल्याचे आपल्याला दिसून येतात त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीराव शेडगे, अण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख, विकास महात्मे, प्रकाश शेडगे, महादेव जानकर, उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर आणि अदृश्य स्वरूपात काम करणारे अनेक नेते, कार्यकर्ते अद्यापही राज्यापुढे येऊ न शकलेले अश्या अनेकांच्या कार्यामुळे या समाजाची ओळख निर्माण झाली असतनाच राज्याच्या राजकारणात दलित राजकारणाची जी स्थिती निर्माण झाली आहे तीच स्थिती राजकीय स्वार्थापोटी धनगर समाजातही झाल्याचं आपल्याला दिसून येते.तरीही राजकीय नेते आजुनही  जागे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.तरी सुध्दा हा समाज  लाजराबुजरा असल्याने, नागरी जीवनापासुन शक्यतो दुरच राहिल्यामुळे त्याचा म्हनावा तसा विकास झालेला नसला तरी  समाजात  शिक्षणाची बीजारोपण झाल्यामुळे समाजातील नवी पिढी समाजाला एक नवी दिशा देण्याच्या काम करण्यासोबतच ह्या समाजाने धरगरांची एक वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती जोपासली व ती विकसित केली हे त्या समाजाचे यश म्हणावे लागेल.





प्रामुख्याने 2014 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपासून धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गाच्या धर्तीवर आरक्षण  द्यावे हा मुद्दा गाजला. त्यातूनच सत्तेच्या स्वार्थापोटी राजकीय पक्षांनी धनगर समाजास पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ हे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाच्या जोरावर राजकीय पक्षानी सत्ता भोगली. त्याचसोबत धनगर समाजामध्ये असंतोष होऊ नये म्हणून सत्तेचा काही वाटा राजकीय नेतृत्वाला दिल्यामुळे राजकीय नेतृत्व सुद्धा शांत राहीले आणि नंतर आरक्षणाचा प्रश्‍न हा आमच्या हातात नाही तर तो केंद्र शासनाच्या हातात आहे असं म्हणत धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचं काम  तत्कालीन सरकारने केले. ह्याच सरकारने पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजामध्ये असंतोष होऊ नये म्हणून धनगर समाजाला आरक्षण न देता आदिवासी समाजाला लागू असलेल्या सवलती  या समाजाला दिल्या त्यामुळे या समाजाचा पुन्हा एकदा असंतोष काही प्रमाणात कमी झाला. एकंदरीतच राजकीय पक्ष सत्तामिळवण्यासाठी कोणत्याही ही प्रकारचे आश्वासन हे वेगवेगळ्या समाजाला देतात आणि त्या समाजाचा पाठिंबा आपल्याला निवडणुकीत कसा मिळेल याचाच विचार या ठिकाणची राजकीय प्रक्रिया करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचे प्रश्न हे सामाजिक न होता राजकीय स्वरूपाचे झालेले आहेत.  एकदरित आरक्षणाचा मुद्द्यामुळे  धनगर समाजात मोठी जनजागृती झाल्यामुळे राजकीयदृष्ट्या हा समाज निवडणुकीच्या राजकारणातील प्रभावी घटक ठरू लागला  तसेच एक गठ्ठा मताचे हुकमी हत्यार ठरल्याचे दिसून येते. कारण राज्यातील ३० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत,त्यावरच तेथील राजकारणाचे भवितव्य ठरते. म्हणून धनगर समाजाचे राजकीय महत्त्व अधोरेखित होते.धनगर समाजाची लोकसंख्या अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली,अकोला, परभणी, लातूर, सातारा,कोल्हापूर,उस्मानाबाद,औरंगाबाद जिल्ह्यात बऱ्यापैकी आहे. त्यामुळेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात धनगर समाजाचे पाच आमदार निवडून आले होते पण त्या पाच आमदारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवता आले नाही हे ही निश्चित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेत पाच वरून धनगर आमदारांची संख्या ही एक वर आलेली आहे. त्यामुळे धनगर समाजाने व धनगर नेतृत्वाला आता स्वतःच मूल्यांकन करायची वेळ आल्याचे आपल्याला दिसून येते.

   राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास सव्वा कोटीच्या आसपास असली तरी हा समाज दऱ्याखोऱ्यात व राहणारा व लाजराबुजरा असल्यामुळे या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंघटितपणा आहे आणि त्या असंघटितपणाचा फायदा समाजातील धूर्त लोक, राजकीय नेतृत्व, शिकलेल्या लोकांनी व इतर राजकीय पक्षाने घेतलेला आहे हे वास्तव आहे. त्यामुळे हा समाज विकासापासून वंचित दूर राहिल्याचे आपल्याला दिसून येते. शासन स्तरावरून समाजाच्या विकासासाठी थातूरमातूर योजना राबवल्या जातात तसेच त्याही योजना निवडणुकीपुरत्या राबवल्या जातात व निवडणुका संपल्या की त्या योजना आपोआप बंद होतात त्यामुळे राज्यातील अन्य समाजाच्या विकासाच्या तुलनेत धनगर समाजाचा मागासलेपण हे डोळ्याने दिसण्यासारखे आहे. त्यामुळे आजही धनगर समाजाच्या  प्रभाव असलेल्या भागांमध्ये धनगर समाजाला शासन स्तरावरून कोणत्याही मूलभूत स्वरूपाच्या सोयी सवलती उपलब्ध होताना दिसत नाहीत हे ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या समस्या ह्या एकाच भागात सारख्या स्वरूपाच्या नाहीत तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्याचे आपल्याला दिसून येते.त्यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाच्या मालकीच्या जमिनीचे प्रश्न हे अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याचे आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये असलेला असंघटीतपणा व दुफळी यामुळे धनगर समाज हे शासनाचे लक्ष वेधू शकत नाही हे ही वास्तव आहे.

त्यातूनच धनगर समाजाला राज्यात जे काहीआरक्षण मिळतं ते आरक्षण केवळ तीन साडेतीन टक्क्यांच्या जवळपास आहे आणि त्यामुळे धनगर समाजाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्या धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातील आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका पुढे येऊ लागली आणि ही भूमिका पुढे येत असताना त्या भूमिकेला सामाजिक दृष्टिकोनातून दुजोरा न देता राजकीय दृष्टिकोनातून दुजोरा देण्याचं काम या ठिकाणच्या राजकीय व्यवस्थेने केलं आणि त्यातच धनगर समाजाचा घात मोठ्या प्रमाणात झाला हे ही वास्तव आहे.

  आदिवासी समाजाच्या आरक्षणामुळे धनगर समाजाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास होईल ही भावना धनगर समाजाला वाटते. त्यातूनच धनगर समाजाला आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर करावी लागत आहे. कारण धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण हे सहजासहजी मिळणार नाही हे राज्यकर्त्यांना चांगले माहिती आहे, त्यातूनच राज्यात आदिवासी विरुद्ध धनगर हा संघर्ष मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. आदिवासी समाजामध्ये धनगड या जमातीला आदिवासी प्रवर्गाचे संपूर्ण आरक्षण व लाभ मिळतात आणि त्यातूनच धनगर आणि धनगड हा उच्चाराचा शब्दभेद  आहे असा  धनगर समाजाचा दावा आहे.

  देशात 70 वर्षांपासून इतर राज्यांमध्ये धनगरांना  आदिवासीचे आरक्षण आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये नाही हा मुद्दा प्रखरतेने पुढे येतो. एकंदरीतच धनगर आणि धनगड या दोन जातींमध्ये सारखेपणा आहे का हे शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टाटा सोशल सायन्सच्या माध्यमातून एक अहवाल तयार केलेला आहे आणि त्या अहवालाचे मूल्यांकन आदिवासी विभागामार्फत होणार असल्याने धनगर समाजाचे भवितव्य ह्या आहवालावरच अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते. एकंदरीत धनगर समाजाला आदिवासी समाज आहे म्हणून ज्या काही चार पाच गोष्टी प्रामुख्याने सिद्ध करणे गरजेचे आहेत त्या गोष्टीमध्ये विशिष्ट भूप्रदेशात वास्तव, जीवन पद्धती व संस्कृती, रक्त संबंध व वांशिक एकता, स्वतःची भाषा लिपी, सामाजिक एकजिनसीपणा व चालीरीती,इ. ह्या निकषांमध्ये धनगर समाज जर बसत असेल तर धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यास कोणतीही अडचण नाही, त्यासाठी शासनाकडे आलेला अहवाल हा आदिवासी विभागाने त्याचे मूल्यांकन करून आदिवासी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या समितीस सादर करून, त्यांनी मान्य केल्यास तो अहवाल मुख्य सचिवाकडे जातो, मुख्य सचिवानी मान्य केल्यास तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आदिवासी सल्लागार समितीकडे जातो, सल्लागार समितीने मान्य केलेला प्रस्ताव हा राज्यपालाकडे व  नंतर राष्ट्रीय आदिवासी आयोगाकडे जातो, राष्ट्रीय आदिवासी आयोगाने मान्यता दिल्यास पुन्हा एकदा भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण विभाग याचा अभ्यास करते आणि त्यांनतर संसदेत धनगर समाजाच्या संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडावे लागते, अशा किचकट प्रक्रियेतून धनगर समाजाच्या आरक्षणाला जावं लागणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात राज्यशासनाचा तो विषय नाही तर तो केंद्र शासनाचा प्रश्न आहे हे ही बाब महत्त्वाची आहे.

  एकंदरीतच आदिवासी समाजाचा दर्जा मिळण्याची ही प्रक्रिया पाहता धनगर समाज यातील काही बाबी पूर्ण करतो हे निश्चित आहे. पण काही बाबी पूर्ण करण्यास त्यांना अडचणी येऊ शकतात. याचाच विचार करता आदिवासी समाज धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करताना दिसून येतो हे ही या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणूनच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्ना संदर्भात टाटा सोशल सायन्सचा अहवाल, आदिवासी समाजासाठी लागणारे निकष ह्या गोष्टीचा विचार करता धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाने आणि  राजकीय सत्ताधाऱ्यांनी ह्या  अग्निदिव्य प्रक्रियेतून  कशे जाता येईल याचा प्रथम विचार करणं गरजेचं ठरणार आहे. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर नेतृत्वाने राजकीय भावनेच्या आहारी न जाता कायदेशीर प्रक्रिया कशी पार पाडता येईल याचाच पहिल्यांदा विचार केला पाहिजे. कारण भावनेपेक्षा कायदा महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे भावनेला कोठेतरी आपण थांबवलं पाहिजे कारण त्या भावनेच्या आहारी जाऊन आज आपण आपला राजकीय स्वार्थ साधतो हे जरी खरं असलं तरी त्या राजकीय स्वार्थाच्या आड लपून आपण आपला समाज इतर राजकीय पक्षांच्या दावणीला बांधतो आहे हे ही राजकीय नेतृत्वाने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे धनगर समाजातील उच्चशिक्षित नेतृत्व आणि उच्चशिक्षित तरुणांनी भावनेच्या आहारी न जाता धनगर समाजाच्या आरक्षणाची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रथम समजून घेऊन त्या प्रक्रियेला कायद्याचा आधार देऊन ते आरक्षण कायदेशीरदृष्ट्या कसं सक्षम होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

  महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती बघितली तर आरक्षणाचे वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. त्यामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण व इतर आरक्षणे ह्याचा विचार करता आरक्षणाचा प्रश्ना संबंधी केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच या ठिकाणी आरक्षणाचा विचार केला जातो आणि म्हणून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदुत्व विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष लावल्या जाऊन आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच विचार या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. म्हणूनच आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सामाजिक दृष्टिकोन व्यापक करणं गरजेचं ठरतं आणि केवळ एका आमदार, खासदार,मंत्री पदापर्यंत आरक्षणाचा विषय नाही तर तो विषय हा व्यापक स्वरूपाचा आहे. याचाही विचार नेतृत्वाने केला तरच राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर आरक्षणाचे प्रश्न हे निश्चितच सुटतील यात शंका नाही. त्यासाठी फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आणि तळमळ ही नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे पण तीच गोष्ट आज प्रत्येक राजकीय नेतृत्व गमावून बसलेला आहे म्हणून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाच्या संदर्भात पुनश्चः एकदा हरिओम म्हणण्याची वेळ आली आहे.

 

( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)











Friday, September 25, 2020

कामगारांचे अस्तित्व संपुष्टात आणणारी कायदेशीर प्रक्रिया

 कामगारांचे अस्तित्व संपुष्टात आणणारी कायदेशीर प्रक्रिया 

डॉ. बालासाहेब किलचे गोरेगावकर

9404021375

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आर्थिक सामाजिक बदल हे मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यातूनच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार जगातील पन्नास कोटी लोकांनी आपला रोजगार सध्याच्या परिस्थितीत गमावलेला आहे.रोजगार गमावण्याची सगळ्यात मोठी आघाडी ही विकसनशील देशांनी घेतलेली आहे त्याला भारतही अपवाद नाही. त्याच भारतात आज रोजगार निर्मितीच्या शोधात बेरोजगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असताना आज नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोजगारीचे विश्‍व वाढण्याची प्रक्रिया याठिकाणी सुरू होती काय अशी भीती सध्याच्या परिस्थितीत निर्माण होताना दिसते. आज देशात बेरोजगारीचे संकट उभे राहिले असतानाच पुन्हा एकदा कामगारांंना बेरोजगार करण्याचे काम नवीन कामगार कायद्याने करून बेरोजगारीचा विश्वगुरू ठरण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू झाली आहे.

भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा विचार करता प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारा नुसार जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. तसेच राज्याच्या निती निर्देशाक मार्गदर्शक तत्वानुसार कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य, कामगारांना काम करण्यासाठी निरोगी वातावरण, कौशल्य निर्मिती यासाठी केंद्र शासन आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आपल्याला दिसून येतात. कारण कामगार, कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा उत्पादनक्षमता आणि आर्थिक आणि सामाजिक विकासावर सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच कामगार आणि आर्थिक विकास याचा नेहमीच परस्पर संबंध असल्याचे आपल्याला दिसून येते.म्हणूनच कौशल्य आणि ज्ञान ही कोणत्याही देशासाठी आर्थिक वाढ आणि सामाजिक विकासाची प्रेरणा देणारी शक्ती आहे.           

  कार्यक्षमतेच्या  संदर्भातील आव्हाने आणि संधीं पाहता उच्च आणि चांगल्या पातळीचे कौशल्य पुरवणारे देश अधिक प्रभावीपणे आपला समायोजित आर्थिक सामाजिक विकास करून जगाचे नेतृत्व करताना दिसतात.म्हणूनच आपल्याला कौशल्य व ज्ञानाची सांगड घालने गरजेचे ठरते.

भारतातील कामगाराचे स्वरूप लक्षात घेता याठिकाणी असंघटीत कामगाराची संख्या जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.त्यामुळे 2022 पर्यंत भारताने 500 दशलक्ष लोकांना कौशल्य देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.त्यासाठी विविध कामगार कायद्यांची निर्मिती,  त्यांची अंमलबजावणी, त्याचप्रमाणे, औद्योगिक वाद,औद्योगिक कलहांचे निराकरण व त्यांस प्रतिबंध, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य,  कामगार कल्याण,यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यात ह्यावर नेहमीच विचारमंथन होत असते.  त्यामुळे कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकार पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.कारण कामगार कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत संसदेत केंद्र सरकारकडून विधेयक मांडण्यात आले ते विधेयक मंजूर केले गेले.या कायद्यानी तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.


  एकदरित सर्व संघटीत व असंघटीत क्षेत्रांमध्ये आवश्यक ती धोरणे, कार्यक्रम, योजना, व परियोजना आखून, आर्थिक सहभाग, सामाजिक सुरक्षितता, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य, तसेच कल्याणकारी योजना राबवून कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे व त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीचे नियमन करणे, धोकादायक व्यवसायातून बाल कामगार प्रथेचे उच्चाटन करणे, त्याचप्रमाणे कामगारविषयक कायद्यांची अंमलबजावणी ह्यासाठी कोणत्याही सरकारला धोरणात्मक भूमिका घ्यावी लागतेच त्याला केंद्र सरकार अपवाद कसे ठरेल?

त्यातून भारतात व महाराष्ट्रात  आतापर्यंत अस्तित्वात काही कायदे आहेत त्यामध्ये,

1.औद्योगिक विवाद कायदा 1947

2.औद्योगिक विवाद (केंद्रीय) नियम, 1957

3.वृक्षारोपण कामगार कायदा 1951

4.औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) नियम, 1946

5.औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) कायदा, 1946,    6.कामगार संघटना (सुधारणा) कायदा, 2001   

7.कामगार संघटना कायदा, 1926

8.श्रमिक संघ अधिनियम, १९२६.

9.किमान वेतन अधिनियम, १९४८.

10.वेतन प्रदान अधिनियम, १९३६.

11.समान वेतन अधिनियम, १९७६.

12.बोनस प्रदान अधिनियम, १९६५.

13.बाल कामगार (प्रतिबंध अ नियमन) अधिनियम, १९८६.

14.मुंबई दुकाने व संस्था अधिनियम, १९४८.

15.बिडी व सिगर कामगार (नोकरीविषयक अटी) अधिनियम, १९६६.

16.कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम, १९७०.

17.इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियम) अधिनियम, १९९६.

18.श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेत्तर (सेवाशर्ती) संकीर्ण अधिनियम, १९५५.

19.विक्री संवर्धन कामगार (सेवाशर्ती) अशीनियाम, १९७६.

20.आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९.

21.उपदान प्रदान अधिनियम, १९७२.

22.प्रसुती लाभ अधिनियम, १९६१.

23.महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९८३.

24.मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१.

25.वेठबिगार पद्धत (निर्मुलन) अधिनियम, १९७६.

26.सिने - कामगार कल्याण निधी अधिण्याम, १९८१.

27.कारखाना अधिनियम, १९४८.

28.सामान्य धारा अधिनियम, १८९७.

29.उद्योग (विकास व नियमन) अधिनियम, १९५१.

30.महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम, २००३.

31.महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.

32.सिक्युरीटायझेशन अधिनियम, २००२.

33.सिनेमा कामगार व चित्रपटगृह कामगार अधिनियम, १९८४.

34.महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

35.महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार 36.अनुचित प्रथा प्रतिबंध अशीनियाम, १९७१.

37.साप्ताहिक सुट्टी अधिनियम, १९४२.

38.लवाद व समेट अधिनियम, १९९६.

39कामगार मोबदला अधिनियम, १९२३.

40.पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६.

41.महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम 1948

42.महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, 1953

 एकदरित कामगार कायदे पाहता आज देशात व महाराष्ट्रात या कायद्याद्वारे सर्व संघटीत व असंघटीत क्षेत्रांमध्ये आवश्यक ती धोरणे, कार्यक्रम, योजना, व परियोजना आखून, तसेच कल्याणकारी योजना राबवून कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे व त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारणे, भारतातुन, राज्यातून धोकादायक व्यवसायांमधून बाल कामगार प्रथेचे उच्चाटन करणे, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहभाग, सामाजिक सुरक्षितता, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य प्रदान करणे याला महत्त्व दिल्या गेले आहे. तरीसुद्धा कामगारांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.

सध्याच्या मोदी सरकारने  लोकसभत औद्योगिक संबंधांवरील तीन कामगार संहिता पास केल्या त्यामध्ये व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा ,या कायद्याच्ये स्वरूप पाहता या संहिताचे उद्दीष्ट केवळ भारतीय पुरातन कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे नाही तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना तसेच इतर राज्यांत काम करण्यासाठी स्थलांतरित झालेल्यांना सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी त्यांची महत्वाकांक्षा वाढविण्यात आली आहे असा सरकारचा दावा आहे. तसेच या तीन कामगार सुधारणांच्या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना कामगार मंत्री संतोष गंगवार म्हणतात की,कामगार सुधारणांचा उद्देश बदललेल्या व्यवसायाच्या वातावरणाला अनुकूल अशी पारदर्शक व्यवस्था पुरविणे हा आहे.तसेच “गुंतवणूकदारांना मोठे कारखाने उभारण्यास आणि अधिकाधिक कामगारांना रोजगार देण्यास प्रोत्साहित केले जाईल.” “याशिवाय २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या ईपीएफमध्ये सहभागी होतील आणि सरकार ईपीएफओचा लाभ स्वयंरोजगारापर्यंत वाढवू शकेल,” यातुन सुमारे 40कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधी उपलब्ध होईल,तसेच या कायद्यानी  व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यरत परिस्थिती संहितेच्या अंतर्गत स्थलांतरित कामगार परिभाषित करण्यासाठी व उत्पन्नाच्या निकषांचा समावेश केला आहे. तसेच सर्व कामगार ज्यांचे मासिक कौटुंबिक उत्पन्न 18,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे दुसर्‍या राज्यात स्थलांतर करतात आणि थेट नोकरी करतात किंवा स्वयं-नोकरी करतात, अशा सर्व कामगारांना या कायद्यात संरक्षण दिले जाईल असा ही दावा सरकारने केला आहे.

त्यामुळे उद्योग विश्वात या कायद्याचे स्वागत होत आहे,या क्षेत्रातील तज्ञाच्या मते, कायद्यातील सर्वसमावेशक सुधारणांद्वारे कोट्यवधी कामगारांना फायदा होईल आणि उद्योगांना लवचिकता, पारदर्शकता व स्पष्टता मिळेल. या कायद्यांचा मोठा परिणाम येत्या काही वर्षांत भारतातील नोकरशक्तीचे सुलभ, वेगवान आणि अनुपालन व्यवस्थापन असेल.व्यवसाय करण्याच्या सुलभतेचा थेट फायदा भारताला वस्तू व वाहतूक क्षेत्रात, रसद, कृषी व कृषी उद्योग, उत्पादन व पुरवठा साखळी, परदेशी कामगारांची औपचारिकता वाढविण्याबरोबरच परकीय गुंतवणूकीसाठी सुलभता वाढेल.

  एकंदरीतच कायद्याच्या दोन्ही बाजू पाहता कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून बदल जारी करण्यात आले असले तरी या कायद्यात अनेक त्रुटी आहेत. कायद्यातील त्रुटी पाहता ३०० कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढता येणार आहे.तसेच कायम स्वरूपी कामगाराची करार पध्दतीने नेमणूक करता येईल.  यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे आपोआपच दूर होतील,कामगारांचा संप करण्याचा हक्क नवीन संहितेनुसार मागे घेण्यात आला आहे. तसेच शासकीय मान्यता न घेता आस्थापने बंद करता येतील.यापूर्वी आवश्यक असलेल्या एकाधिक परवान्यांऐवजी कर्मचार्‍यांना स्वतंत्र परवान्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी कंत्राटीवर कामगार ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांना एकाच परवान्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे कामगाराच्या नौकरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे.तसेच कंपन्याना कामगारांना कधी ही कमी करता येईल.भांडवलदार आपली कंपनी कधीही बंद करू शकतो.एकदरितच कामगार विषयावर सुधारणेच्या नावाखाली कामगाराचे हितसंबंध धोक्यात आण्याचे काम या कायद्याने होणार आहे. त्यामुळे कामगारांच्या हिताचा विचार करण्यासाठी गेल्या सत्तर वर्षात देशात अनेक कायदे अस्तित्वात असूनही कामगारांचे हितसंबंध सुरक्षित राहण्यास अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. स्थायी व अस्थायी क्षेत्रातल्या कामगाराचे स्वरूप वेगळे आहे ,त्यामुळे स्थायी आणि अस्थायी अशा कामगारांच्या श्रेणीचे ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्यावेळी अस्थायी कामगार हे कोणत्या परिस्थितीत जीवन जगतात याचाही विश्लेषण करणं ही काळाची गरज आहे पण अस्थायी कर्मचाऱ्यांंकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही. तसेच आज भारतातील कामगारांचे असंघटित असल्याचं स्वरूप ही मोठे आहे त्यामुळे असंघटित कामगारांचे प्रश्न हे प्रशासनासमोर येत नाहीत म्हणून असंघटित कामगारांना नरका यत्नात आपलं जीवन भोगावे लागते, याचा विचार या कायद्यात सरकारकडून होताना दिसत नाही त्यामुळे कामगारांच्या भवितव्याचा विचार करता हे कायदे कामगारसाठी मारक व भांडवलदारासाठी वरदान ठरतील का?  हे येणारा काळच ठरवेल.



( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)

































Tuesday, September 22, 2020

शेती सुधारणा कायदे आणि शेतकरी

       


शेती सुधारणा कायदे आणि शेतकरी

                         डॉ. बालासाहेब किलचे गोरेगावकर

                                                   9404021375


भारत हा कृषीप्रधान देश आसतानाही स्वातंत्र्यानंतरही भारतीय शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज असताना शासन स्तरावरून कृषीविषयक धोरणांमध्ये काही बदल होताना आपल्याला दिसून येतात.  शासनाकडून जे काही बदल केले जातात  त्या बदलाच्या अनुषंगाने प्रामुख्याने भारतीय शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे ती मागणी म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला योग्य प्रमाणात भाव द्यावा ही मागणी शेतकरी गेली अनेक वर्ष करत आहेत. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना प्रामुख्याने या दोन मागण्यांच्या भोवतीच भरडवण्याचे काम या ठिकाणची राजकीय प्रक्रिया करते. आणि मग त्या शेतकऱ्यांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेले सरकार या ठिकाणी स्वामीनाथन आयोग, उत्पन्नाची हमी, उत्पन्नाचा हमीभाव यावर भाष्य करताना किंवा चर्चा करताना शेतकऱ्यांचे हित कसे साधल्या जाईल याचा अद्यापही विचार करताना दिसत नाही. त्यामुळे भारतामध्ये कृषी क्षेत्रात जी असंवेदनशीलता दाखवली जाते त्या असंवेदनशीलतेच्या परिणामातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतांना आपल्याला दिसून येतात. शेतकरी आत्महत्येवर अंतिम उपाय शोधण्याच्या ऐवजी त्यावर मलमपट्टी शोधण्याचं काम या ठिकाणचे सरकारे करतात.एक सरकार गेल्यानंतर दुसरे सरकार दुसऱ्याच योजना या ठिकाणी राबवताना दिसतं आणि त्याचे परिणाम पाहता शेतकऱ्यांचे हित साधण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत ही भूमिका सर्वांसमोर मांडण्यात या ठिकाणचे राजकीय नेतृत्व यशस्वी होताना आपल्याला दिसून येते. त्यातूनच कृषी सुधारणांच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने नुकतेच तीन कायदे पास केले आहेत. त्या विधेयकाच्या अनुषंगाने या ठिकाणी साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित असताना शासनाकडून घाईगडबडीत, गोंधळाच्या परिस्थितीत, बहुमताच्या जोरावर, केंद्र शासनाने कृषी सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलेले आहेत. जर या कृषी सुधारणांच्या अनुषंगाने जर खरच शेतकर्‍यांचे हित साधल्या जाणार असेल तर मग शासनाने इतक्या गडबडीने, गोंधळाच्या स्थितीत अशी विधेयक मंजूर का केली, याचाही ऊहापोह करणं आपल्याला गरजेचं ठरतं.

केंद्र शासनाने कृषी सुधारण्याच्या संदर्भात जी तीन विधेयक पास केली त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमन मुक्ती कायदा आणि करार शेती या संदर्भात ही तीन विधेयक आहेत. या तीन कायद्याच्या संदर्भात शासनाकडून जी माहिती समोर आली त्यामध्ये असे स्पष्ट सांगण्यात आलं की या कायद्याद्वारे शेतकऱ्यांचं हित हे मोठ्या प्रमाणात साधल्या जाईल. ज्याप्रमाणे शासनाने आपली भूमिका मांडली त्याच पद्धतीने देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा हे तीन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत यावरून लोकसभेत आणि राज्यसभेत गदारोळ उठवून ती विधायक पास होऊ नये ह्यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतात. 

या तीन विधेयकांमुळे अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायद्याद्वारे शेतीमालाला अत्यावश्यक वस्तूंमधून वगळण्यात येणार आहे,तर दुसऱ्या कायद्यात बाजार समित्या ह्या अडत्या आणि दलाला पासून नियंत्रणमुक्त होतील असं सांगितलं जातं, तर तिसऱ्या कायद्यात करार शेती अध्यादेशामुळे कंपन्याही कराराने शेती करू शकतील. ह्या या बदलांचा विचार करता खरंच ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत का नाही याचा विचार करता शासनाने या कायद्याच्या माध्यमातून जरी शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा करण्याची भूमिका घेतली असेल तरीसुद्धा प्रामुख्याने या तिन्ही कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी दिसतात त्या त्रुटीचा विचार करता शेतीमालाला अत्यावश्यक वस्तू मधून वगळण्यात आल्यामुळे शेतकरी नक्कीच हा अडचणीत येऊ शकतो, कारण अत्यावश्यक वस्तू सेवा मधुन शेतमालाला वगळल्यामुळे शासनाने आपोआपच शेतीमालावरील आणि शेती उत्पादन प्रक्रियेवरील आपला हात झटकण्याचा व शेतकऱ्यांना आत्मनिर्भरते पासून दूर नेण्याचा जणू काही इशाराच या कायद्याने दिला आहे.अत्यावश्यक सेवा व वस्तू कायद्या मधून शेती मालाला वगळल्यामुळे हमीभावाच्या संदर्भात वाढ करण्याचा प्रयत्न शासन करताना दिसते. म्हणजेच एका हाताने द्यायचे व दुसर्‍या हाताने काढून घ्यायचे हा विचार या कायद्याद्वारे सरकारकडून होतोय. अत्यावश्यक सेवा वस्तू मधून शेतीमाल वगळल्यामुळे हमीभाव द्यायचा का नाही हे शासन ठरवेल, एकंदरीतच हमीभावाच्या संदर्भात ज्या वेळेस बोलल्या जाते त्यावेळेस शासनाकडून सांगितल्या जाते की हमीभावाची जी काही मर्यादा आहे ती मर्यादा आम्ही वाढवतोय त्यामुळे शेतकऱ्यांचे याठिकाणी नुकसान होत नाही अशी शासनाची भूमिका आहे. पण ही भूमिका अत्यंत चुकीची आहे कारण अत्यावश्यक सेवा वस्तू मधून शेतमाल वागळल्यामुळे हमीभावा संदर्भात खरी समस्या निर्माण होऊ शकते ही एक प्राथमिक उणीव वस्तू सेवा कायद्याद्वारे निर्माण झाल्याचे दिसून येते. हमीभावाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस हमीभावाचा फायदा नेमका किती शेतकऱ्यांना होतो हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. कारण ज्यावेळी शेतकऱ्यांकडे शेतमाल येतो त्यावेळी हमीभावाची प्रक्रिया या ठिकाणी सुरु नसते आणि मग त्यामुळे शेतकऱ्याला आपला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा इतर व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. त्यामुळे हमी भाव म्हणजे एक फसवणुकीचे साधन आहे हे नक्की आहे. शेतकऱ्याकंडे शेतीमाल आल्यानंतर एक किंवा दोन महिन्यानंतर हमीभावाची प्रक्रिया सुरू होते. मग त्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला आपला माल हमीभावाने देण्यासाठी नोंदणी करावी लागते. मग नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा नंबर कधी येईल याची शाश्वती नाही. कारण त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. या भ्रष्टाचाराचे स्वरूप पाहता ज्या ठिकाणी हमीभाव शेतमालाची खरेदीची काही केंद्र शासन सुरु करते त्या ठिकाणी केंद्र ज्यांनी चालवायला घेतलेली आहेत त्याठिकाणी सर्वप्रथम त्या केंद्राशी जे लोकं संबंधित आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, यांचा शेतीमाल या ठिकाणी पहिल्यांदा घेतल्या जातो, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांचा शेतीमाल या ठिकाणी प्रथम स्वीकारल्या जातो. तसेच या ठिकाणी हमी भावासाठी शेतीमाल हा अत्यंत उच्च दर्जाचा असणं गरजेचं असतं पण अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल हा अत्यंत उच्च दर्जाचा होऊ शकत नाही, कारण आस्मानी संकट शेतकऱ्यांचा शेतीमाल अनेकवेळा खराब करते त्यामुळे हमीभावासाठी शेतकरी आडून बसत नाही. जो पैसा त्याला मिळेल त्या पैशात तो शेतकरी तो शेतीमाल विकतो आणि मोकळा होतो. त्यामुळे हमीभावाची जी काही संकल्पना आहे ती छोट्या शेतकऱ्यांना उपयोगाची ठरत नाही, तर ती मोठ्या शेतकऱ्यांना उपयोगाची आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू सेवा मधून शेतीमाल वागल्यामुळे व त्याला हमीभावाचे लेबल लावल्यामुळे हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे शासनाकडून पटवून दिल्या जात आहे.

दुसऱ्या कायद्यात बाजार समित्या नियंत्रणमुक्त करण्यात येत आहेत.त्या नियंत्रण मुक्तीच्या संदर्भात असं कारण दिलं जातं की शेतकऱ्यांना शेतीमाल विकताना जी काही आडत, दलाली द्यावी लागते ती या कायद्याद्वारे देता येणार नाही. म्हणजेच व्यापार बाजार समितीतील दलाली बंद होईल हे जरी महत्त्वाचं असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांचा शेतीमाल हा बाहेर हमीभावाने कोणी खरेदी करेल याची शाश्वती काय? यावर सरकार याठिकाणी काही बोलत नाही. बाजार समितीत अनेक व्यापारी असल्यामुळे कोणता ना कोणता तरी व्यापारी तो शेतीमाल खरेदी करेलच याची शाश्वती असते, पण खुल्या बाजारात तो शेतीमाल घेणाऱ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी तयार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हवा असलेला भाव बाहेरील व्यापारी देतीलच याचीही शाश्वती नाही. एकीकडे शासन बाजार समित्यांचे अस्तित्व संपवू पाहत आहे. पण त्याच आधारावर अनेक राज्यांमध्ये खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत त्याचं काय? तर अनेक शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत विकायलाही आणत नाहीत. तर तो शेतीमाल बाहेर कुठेही विकला जातो. म्हणजेच बाजार समितीत व बाहेरही शेतकऱ्यांची लूट ही मोठ्या प्रमाणात होतेच, त्या ठिकाणी होणारी शेतकऱ्यांची लूट ह्यावर शासन काय करेल याचा ही कुठेही ऊहापोह शासनाकडून होत नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे नियंत्रण कमी होईल व शेतकरी आपला शेतीमाल कोणालाही विकू शकेल अशी भोळी भाबडी आशा या कायद्याद्वारे शेतकऱ्यांना दाखवली जाते. 

तिसरा शेतीसुधारणा करार कायदयाचे स्वरुप पाहता हे तिन्ही कायदे परस्परांवर अवलंबून आहेत, परस्परांशी संबंधित आहेत. करार शेती पद्धतीमध्ये याठिकाणी असं वातावरण तयार केले जात आहे की या ठिकाणी अनेक मोठ्या कंपन्या येतील आणि त्या कंपन्या शेतकऱ्यांची शेती ही करार पद्धतीने करतील आणि त्या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, हा विश्वास शेतकऱ्यांना दिला जातोय. या करार पद्धतीमुळे छोट्या शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल कारण छोट्या शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत आणि मग त्यामुळे कोणतीही कंपनी त्यांच्याशी करार करेलच याची शाश्वती ही देता येत नाही. कारण मोठ्या कंपन्यांना छोटे छोटे शेतकरी सांभाळण्या पेक्षा त्यांना पाच-दहा मोठे शेतकरी सांभाळने उपयोगाचे असते, त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या करार शेतीचा किती फायदा होईल हे सांगणं सध्यातरी अवघड आहे. मोठ्या शेतकऱ्यांचा शेतीमाल हा करार पद्धतीमुळे कंपन्या घेतील आणि मग त्यांचा  शेतीमाल कंपन्यांनी खरेदी केल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईलही पण छोट्या शेतकऱ्याचा शेतीमाल ह्या कंपन्या घेतीलच याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा खासगी व्यापाऱ्यांच्या हाताकडे पाहिल्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय शेतकऱ्यांपुढे उरत नाही.त्यामुळे शेती सुधारणा करताना शासनाकडून शेतीसुधारणा विधेयकाच्या संदर्भात जी काही कारणे दिली ती कारण पाहता  शेतकऱ्यांच्या संदर्भात शासनाला खरच आस्था आहे का? हाच विषय महत्त्वाचा ठरतो. 

   

एकंदरीतच शेती सुधारणा विधेयकाच्या संदर्भातील यश अपयश आणि मूल्यांकन केल्यानंतर असं लक्षात येते की या कायद्यांचे फायदे हे 25 टक्के तरी असले तरी 75 टक्के नुकसान हे शेतकऱ्यांचे होणार आहे याचा विचार या ठिकाणी सरकारकडून केला गेला नाही. बाजार समित्यांच्या माध्यमातून दलाल मुक्तीचे जे स्वप्न सरकारकडून दाखवल्या चाललं तेही चुकीचे आहे, कारण या कायद्याने दलाली बंद होऊन महादलाली निर्माण होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच मोठ्या समुद्रात अनेक छोटे मासे न ठेवता त्या छोट्या माशांना गिळंकृत करून या ठिकाणी फक्त समुद्रामध्ये चार-पाच मोठे मासे गब्बर करायचे, हाच विचार या ठिकाणी सरकार करताना दिसतेय. म्हणूनच मार्क्‍सनं समाजात सांगितलेला अहिरे आणि नाहीरे ह्या वर्गाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी गरीब हा कसा गरीबच राहिल व श्रीमंत हा कसा अधिक श्रीमंत होईल याचा विचार या ठिकाणी सरकारकडून होताना दिसतो. म्हणजेच समुद्रातील अनेक मासे सांभाळण्यापेक्षा चार-पाच मासे सांभाळणं कधीही सोप्प असतं,कारण त्या गब्बर माशांना आपण कधीही घशात घालू शकतो हा विश्वास सरकारला असल्यामुळेच हे कायदे रेटण्याचे काम सरकारकडून होताना आपल्याला दिसून येते. पण या कायद्याच्या समर्थनार्थ काही लोक असे म्हणतात की स्वातंत्र्याची नवीन पहाट उगवत आहे, शेतकरी स्वातंत्र होत आहेत, शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार माल विकता येईल, शेतकऱ्यांना या कायद्याद्वारे जरी आपला शेतमाल विकण्यासाठी स्वातंत्र्य असले तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांची पिळवणूक करणे हे व्यापाऱ्यांच्या, कंपन्यांच्या हाती जाणार आहे, म्हणजेच सरकार शेतकऱ्यांचा विचार करते की कंपन्यांचा विचार करते याचा विचार याठिकाणी समर्थन करणाऱ्यांनी करावा.त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून विरोधी पक्षाचा, शेतकऱ्यांचा आवाज हा बहुमताच्या जोरावर दाबला जात आहे हे नक्की.

( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)

Saturday, September 19, 2020

मराठा आरक्षण आडलय राजकारणात


        मराठा आरक्षण आडलय राजकारणात

      डॉ. बालासाहेब किलचे गोरेगावकर

                                      9404021375


महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा  हा संवेदनशील असा विषय आहे. या संवेदनशील विषयाला फुकांर घालण्याचं काम या ठिकाणची राजकीय प्रक्रिया करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हा नेहमीच चर्चला जातो. काही दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण त्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा तरुणांच्या मनात मोठ्याप्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कारण त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता सर्वोच्च न्यायालय हिसकावून घेते की काय अशी मानसिकता या तरुणाची झालेली आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईला आरक्षणाच्या संदर्भात वास्तविकता आणि वस्तुस्थिती जाणून घेऊन आपली भूमिका ही निश्चित करावी लागणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता मराठा तरुण हा वस्तुस्थिती आणि वास्तविकता जाणून घेण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा आंदोलनाला तयार होताना दिसतो. आंदोलन करणे हे स्वाभाविक आहे, पण हे आंदोलन करताना आपल्या आंदोलनाच्या मागे लपून आपलं अस्तित्व सिद्ध करणारी प्रक्रिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे आणि त्याचाच गैरफायदा घेऊन मराठी तरुणांना आंदोलन करायला लावून आपली राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्याचे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आरक्षणाच्या संदर्भात विनोद  पाटला सारखे कार्यकर्ते सोडले तर बाकीचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे विनोद पाटील प्रामाणिकपणे कार्य करतात त्या प्रमाणात इतर मराठा कार्यकर्ते कार्य  करताना दिसत नाहीत. म्हणून प्रथमता मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी थोडीशी आपली मानसिकता सकारात्मक स्वरूपाची ठेवून आपली भूमिका जाहीर करणं गरजेचं ठरतं, पण आज कोणीही उठल्यासुटल्या मराठा आंदोलनाच्या नावाखाली स्वयंघोषित निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे मराठा आंदोलनाचं जे काही स्वरूप आहेत ते स्वरूप पाहता आंदोलकांची भूमिका वेगळी, राज्यकर्त्यांची भूमिका वेगळी, कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येतं, त्यामुळे मराठा आंदोलनामध्ये कार्य करणार्‍या ज्या काही मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी एकत्र येणे पहिल्यांदा गरजेचं ठरतं आणि त्यानंतर आपल्या आंदोलनाची रूपरेषा ठरवणं गरजेचं ठरतं आणि त्यानंतर आरक्षणाची जी काही मागणी आहे ती मागणी कशा पद्धतीने पुढे नेता येईल याचा विचार करणं गरजेचं ठरतं.  कारण ज्या ज्या वेळी मराठा आंदोलन होते त्यावेळी या मराठा आंदोलनाची दखल घेतल्या जाते आणि त्या आंदोलनाला एक नवी दिशा प्राप्त होते.

  मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात जवळपास अनेक महामोर्चा निघाले, अनेकांनी बलिदान दिली आणि या मोर्चा सह बलिदानाचा विचार करता आरक्षण मिळाल्यानंतर आरक्षण टिकविण्यासाठी जी काही कसरत इतर मराठा समाजाच्या संघटनांनी करणं गरजेचं होतं  ती कसरत याठिकाणी झालेली नाही, कारण  मराठा आरक्षण विधानसभेने मंजूर केले म्हणजे मराठा आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे या अविर्भावात या ठिकाणचा मराठा तरुण आणि मराठा संघटना राहिल्या आणि आम्ही आरक्षण दिलं त्यामुळे ती टिकवण्याची जबाबदारीही तुमची आहे ही भूमिका राज्यकर्त्यांनी घेतली आणि त्याच अनुषंगानं हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाकडे गेले. मराठा आरक्षण हे असे एकमेव आरक्षण आहे की जे देशातील इतर आरक्षणापेक्षा उच्च न्यायालयात टिकले, आणि ज्याप्रमाणे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले त्याचप्रमाणात ते सुप्रीम कोर्टातही टिकेल हाच अविर्भाव राज्यकर्त्यांना आणि संघटनांना वाटला.

     ज्या वेळी सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला स्थगिती मिळाली त्याच वेळी या आरक्षणाच्या संदर्भात अनेक वावड्या उठायला सुरुवात झाली. त्या म्हणजे महाराष्ट्र शासनाचे वकील युक्तिवाद करण्यास कमी पडले, गायकवाड आयोगाचे वाचन सर्वोच्च न्यायालयात झाले नाही, महाधिवक्ता यांची विसंगत विधाने आणि त्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकलं नाही असा युक्तिवाद केला जातो तो युक्तिवाद हा अत्यंत चुकीचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण इद्रा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्‍क्‍यांच्या वर नेता येत नाही हा जो काही निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या आधारावरच या निर्णयाला स्थगिती मिळाल्याचे आपल्याला दिसून येते, त्यामुळे मराठा आरक्षण हे केवळ या गोष्टी केल्या नाही किंवा त्या गोष्टी केल्या नाही यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही तर या आरक्षणाला तांत्रिक कारणामुळे स्थगिती मिळाली आहे, ती तांत्रिक कारण जोपर्यंत दुरुस्त केल्या जाणार नाहीत तोपर्यंत मराठा आरक्षणाचा अस्तित्व हे नक्कीच धोक्यात असल्याचे दिसून येते. 

     त्यामुळे हे जे काही तांत्रिक कारण याठिकाणी समोर येतं त्या तांत्रिक कारणाचा विचार करता मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही केवळ मराठा संघटनांची नाही तर तेवढीच जबाबदारी ही शासनाची, राज्यकर्त्यांची सुद्धा आहे पण त्या दृष्टीने राज्यकर्ते हे हे कमी का पडतात याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. कारण तशी राजकीय परिपक्वता आपल्या महाराष्ट्रीयन नेत्यांकडे नाही.  म्हणून हामुद्दा प्रखरतेने समोर येताना दिसून येतो कारण मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मराठा आरक्षणावर कोणत्याही राजकीय नेतृत्वाने कधीही भाष्य केलेले नाही. आणि ज्यावेळी मराठा आरक्षण धोक्यात येते त्या त्या वेळी वेगवेगळे अनेक पिल्लू सोडले जातात आणि मग त्या पिल्लूच्या माध्यमातून कधी अध्यादेश काढावा, कधी ओबीसी आरक्षण द्या, कधी ओबीसी मध्ये दुसरा प्रवर्ग तयार करा यावर भाष्य केलं जाते, पण राजकीय नेतृत्व कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, याचाही आपल्याला विचार करणे गरजेचे ठरते. अध्यादेश काढणे,ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे ह्या गोष्टी म्हणजे वेळ मारून नेण्याच्या गोष्टी आहेत. कारण राजकीय नेतृत्वाला हे पक्कं माहीत होतं की मराठा आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावर दिलं म्हणजे मराठा आरक्षणाचा आपल्याला राजकीय फायदा होईल आणि त्यानंतर आपलं सरकार जर आले तर ठीक आहे. नाहीतर याची सर्वस्वी जबाबदारी ही दुसऱ्या सरकारवर येऊन पडते आणि मग या दुसऱ्या सरकारला आपल्याला कसं कात्रीत पकडता येईल याचा विचार करून मराठा आरक्षण देताना मराठा आरक्षणा मध्ये अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्या त्रुटींवर कोणत्याही मराठा संघटनांनी, मराठा नेतृत्वाने यावर कधीही भाष्य केलं नाही किंवा कधीही त्यावर चर्चाही घडवून आणली नाही. फक्त मराठा आरक्षण मिळत याचाच विचार या लोकांनी केला आणि त्याची फळ आज मराठा समाजाला भोगावे लागत आहेत. 

   त्यामुळे मराठा आरक्षणातील ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत त्या तांत्रिक त्रुटी सर्वप्रथम काढणं आवश्यक आहे. त्या तांत्रिक त्रुटी जर आपल्याला काढायच्या असतील तर तशी मानसिकता या ठिकाणच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाना बनवावी लागणार आहे पण या ठिकाणची सध्याचे जे विरोधक आहेत ते विरोधक हे कोणत्याही गोष्टीत राजकारण करण्यास कटिबद्ध असल्यामुळे त्यांना हा मुद्दा म्हणजे त्यांच्या हातात कोलीत मिळाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे या विरोधकांनाच मराठा संघटनांनी पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की ज्यावेळी मराठा आरक्षण हे विधानसभेत मंजूर केल्या गेले त्याच पद्धतीने आजच्या विरोधी पक्षाचे केंद्रातही सरकार सत्तेवर होतं आणि मग त्या केंद्रातील सरकारला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी अशी कोणतीही विनंती केली नाही की ज्याप्रमाणे आम्ही विधानसभेत ठराव करून मराठा आरक्षण मंजूर केलं त्याच पद्धतीने तुम्ही ही लोकसभेत आणि राज्यसभेत घटनादुरुस्ती करून या आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी जर भूमिका घेतली असती तर आज ही अडचण निर्माण झाली नसती याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे ठरते. पण ह्या गोष्टी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केल्या नाही आम्हीच फक्त मराठा आरक्षण देऊ शकतो या अविर्भावात त्यांनी मराठा आरक्षण दिलं. त्यामुळे आज जर मराठा आरक्षण टिकवायचं असेल तर सर्वस्व जबाबदारी ही राजकीय नेतृत्वाची, सत्ताधाऱ्यांची, विरोधी पक्षाची आहे. आणि ते करताना जोपर्यंत इथले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारला विनंती करणार नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला मिळालेले स्वतंत्र आरक्षण टिकवणे म्हणजेच एक अवघड गोष्ट आहे आणि ही वस्तुस्थिती मराठा समाजाच्या तरुणांनी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा नाही अशी ही बनवाबनवी न करता केंद्र सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भात स्वतंत्र घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षणाचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालया पेक्षाही सर्वप्रथम ही केंद्र सरकारची आहे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. 

    म्हणून त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारला या विषयावर धारेवर धरलं पाहिजे, घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण हे नव्या अनुसूचित टाकण्यात गरजेच आहे, त्यासाठी केंद्र सरकारलाही मोठी कसरत करावी लागणार आहे कारण हा फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही तर देशातील इतर अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही बाब किती गांभीर्याने घेईल याचाही विचार करणं गरजेचे ठरते. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के पर्यंत आहे ती  मर्यादा  काढून टकून ती साठ टक्‍क्‍यांपर्यंत कशी जाईल याचाही विचार केंद्र सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय धुरिणांना हा प्रश्न राजकीय प्रतिष्ठेचा न करता या प्रश्नांच्या भोवती मराठा समाजाचं जे काही आर्थिक सामाजिक शैक्षणिक नुकसान होतं त्या नुकसानाची माहिती केंद्र सरकारला जोपर्यंत तुम्ही पटवून देत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारही राजी होणार नाही. 

  त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाकडून तामिळनाडूला एक न्याय व आम्हाला दुसरा न्याय अशी जी काही अशी ही बनवाबनवी चाललेली आहे ती बनवाबनवी आता तरी थांबवावी. कारण तामिळनाडू मधले जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात तामिळनाडू सरकारने ते आरक्षण हे घटना दुरुस्ती प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतलं त्यामुळे त्या आरक्षणाचे फायदे तेथील लोकांना होतात. हे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाला सुद्धा माहिती आहे पण त्यांची मानसिकता ही मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी नाही. त्यामुळे ते मराठा आरक्षणाची बनवाबनवी करताना दिसतात. आणि त्यातच मराठा तरुण, मराठा समाज आजही मोठ्या प्रमाणात भरडला जातो. त्यामुळे मराठा समाजाच्या संघटनांनी, तरुणांनी वास्तविकतेकडेवळून मराठा आरक्षण कसं मिळेल याचा विचार करणे गरजेचे आहे.आणि तो विचार करत असताना मराठा आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण येणार नाही याचाही विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा नेतृत्वानेही उठ सूट राजीनाम्याची भूमिका घेऊ नये, राजीनामा देणे म्हणजे पळकुट्याची भूमिका  आपण घेत आहोत का  याचाही विचार मराठा नेतृत्वाने करणे गरजेचे आहे. राजीनाम्याची भाषा करणे म्हणजे आपली पुढच्या पंचवार्षिकची सोय लावणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठा नेतृत्व वागते,  त्यामुळे मराठा नेतृत्वाने आशा वागण्याची मानसिकता आता तरी बदलावी, आपल्या पंचवार्षिकसाठी मराठा समाजाला आपल्या दावणीला बांधण्याची हिंमत मराठा नेतृत्वाने आतातरी करू नये.

  मराठा आरक्षणाचा प्रश्न हा जर तांत्रिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या जर सोडवायचा असेल तर महाराष्ट्र शासनापुढे सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे  मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे हाच एकमेव पर्याय आहे. पण तो पर्याय पाहता सत्ताधारी  आपली मतपेढी शाबूत राखण्यासाठी  याचा वापर करताना दिसत नाहीत. म्हणून आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा यांचे सामाजिक धुर्वीकरण कसं होईल याचाच विचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विचार करता स्वतंत्र आरक्षण हे तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही सरकार देऊ शकत नाही, दिले तरी ते टिकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सौंहदर्याचं वातावरण खराब न करता  आरक्षणासंदर्भात जो काही पेच निर्माण झाला आहे तो पेच  हा ओबीसीच्या मार्गातूनच सुटू शकतो याचाही विचार शासनाने आणि राज्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा आहे, कारण  विदर्भात मराठा कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात येतो, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा  मराठा कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात येतो,  उत्तर महाराष्ट्रात सुद्धा लेवा पाटील च्या माध्यमातून  मराठा समाज प्रवर्गात ओबीसी प्रवर्गात येतो. राहिला प्रश्न फक्त मराठवाड्याच्या मराठा समाजाचा, मराठवाड्यातील मराठा समाजाचा सुद्धा आर्थिक, सामाजिक, राजकीय संबंध हे  विदर्भ,  पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील मराठ्यांचशी आहेत. त्यामुळे  केवळ  मराठवाड्यातील  मराठा  हे  जमीनदार आहेत, वतनदार आहेत  या आधारावर  मराठ्यांना  वंचित ठेवू नये. कारण जमीनदार,वतनदारांची संख्या सोडली तर मराठवाड्यातील मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा ही अत्यंत खालावल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांना महाराष्ट्रातच एका भागात एक न्याय तर दुसऱ्या भागात वेगळा न्याय का याचीही कुठेतरी चिकित्सा होणे आज गरजेचे ठरतं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी  मधला मार्ग काढून जर मराठ्यांना न्याय देता आला तरच तरंच मराठा समाजाला न्याय मिळू शकेल.आणि ही प्रक्रिया होत असताना ओबीसी नेतृत्व आणि मराठा नेतृत्वाने सुद्धा आगीत तेल ओतण्याचे काम करू नये कारण आज दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात तेल ओतण्याचे काम या ठिकाणी होत आहे. 

   आज मराठा आरक्षण हे सामाजिकते पेक्षा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्ये ठरल्या मुळेच आज मराठा आरक्षण हे राजकारणाच्या परिघात अडकलेले आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाने सामाजिक की राजकीय यांच्या वादात न पडता सामाजिक दृष्टिकोनातून, सामाजिक भावनेतून या आरक्षणाचा विचार करणं ही काळाची गरज आहे. 




( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)




मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...