https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : सार्वभौमत्वाच्या नावाखाली रंगले ट्विटर वाँर......
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Saturday, February 13, 2021

सार्वभौमत्वाच्या नावाखाली रंगले ट्विटर वाँर......

       सार्वभौमत्वाच्या नावाखाली रंगले ट्विटर वाँर…..


आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यमांचा वाढलेला बोलबाला पाहता आज  प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समाज माध्यमे ठरू लागली आहेत. त्यामुळे समाज माध्यमातून व्यक्त होणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी असल्याचे दिसून येते. कारण समाज माध्यमांमध्ये तुम्ही काय लिहिता, त्याचा परिणाम समाजावर काय होणार आहे आणि समाज माध्यमांचा उपयोग कसा करून घेता यावरच समाज माध्यमांचे व  वापरणाऱ्यांच्ये भवितव्य ठरते. त्यामुळे ज्या पद्धतीने समाज माध्यमावर तुम्ही व्यक्त होता त्याच पद्धतीनं समाज माध्यम  तुम्हाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवते आणि त्याच पद्धतीने लोकप्रियतेच्या धुंदीत एखाद्या चुकीच्या गोष्टींच्या संदर्भात समाजमाध्यमावर तुम्ही व्यक्त झाल्यानंतर तुमचं अस्तित्व शून्य करायलाही मागेपुढे पाहत नाही त्यामुळे समाज माध्यमांचा वापर कसा करावा हा  ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून समाज माध्यमांवर व्यक्त होतांना प्रत्येकाला स्वतःला सांभाळून घ्यावं लागतं. पण आज समाज माध्यमांवर लोकप्रियतेच्या नावाखाली व्यक्त होतांना लोक स्वतःला सांभाळून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आज प्रत्येकालाच समाज माध्यमांची भुरळ पडली आहे. त्यामुळे आपण त्यात किती वाहून जायचं आहे हा त्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे समाज माध्यमांचे जेवढे फायदे आहेत तेवढेच दुष्परिणामही आहेत. म्हणून समाज माध्यमातून व्यक्त होताना प्रत्येकाने शक्य तो सत्यता असत्यता जाणून घेऊनच व्यक्त व्हावं  ही समाज माध्यमाची अलिखित आचारसंहिता आहे. 

    म्हणूनच ज्या समाजाचे आपण  नेतृत्व करतो त्या समाजाच्या सर्व स्तरापर्यंत समाज माध्यम तुम्हाला घेऊन जाते म्हणून नेतृत्वाने समाज माध्यमांचा वापर करतांना दक्ष राहणे गरजेचे ठरते अन्यथा समाज माध्यमांवर तुम्ही  केलेली नकळत व जाणीवपूर्वक चूक ही तुमची लोकप्रियता मातीत घालू शकते. म्हणूनच आज समाज माध्यमांमध्ये भावनेच्या पुरात वाहून जाता येत नाही, जर तुम्ही भावनेच्या पुरात वाहून गेला तर समाज माध्यमे आणि समाज नक्कीच तुमचा सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर करू शकतात त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे समाज माध्यम हे एक शास्त्र आहे त्या शास्त्राचा उपयोग प्रत्येकाने अभ्यास करुन केला पाहिजे.

   ज्या समाज माध्यमाच्या संदर्भात आपण विचार करतो आहोत त्यावेळेस आज समाज माध्यमांमध्ये ज्याला आपण आदर्श मानतो त्यात महान व्यक्ती नेहमीच समाजा माध्यमात व व्यक्त होतात आणि त्या समाज माध्यमावर व्यक्त झाल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी आदर्श, विचार,प्रेरणा आपल्याला मिळेल या उद्देशाने त्यांचे समाज माध्यमांवर त्यांना फॉलो करणारांची  संख्या लाखोंच्या घरात असते. फॉलो करणारे हे तुमच्या विचाराचे असतीलच याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे लाखो फॉलोअर्स समोर व्यक्त होतांना समाज भान ठेवणं गरजेचं असतं पण ते समाज भाण भारतीय सेलिब्रेटिंकडून, भारतीय क्रिकेटपटूकडून मधल्या काळात होऊ शकलं नाही ही एक वस्तुस्थिती आहे. त्याला कारण ठरलं ते गेले दोन महिन्यापासून चालू असलेले शेतकरी आंदोलन. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाँप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतीय सेलिब्रिटीज हे झोपेतून खडबडून जागे झाले. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कलाकार हा भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात समर्थनाचे ट्विट करतो आणि त्या ट्विटच्या आधारावर भारतीय सार्वभौमत्व कसे धोक्यात आलं आहे किंवा धोक्यात येत आहे ही अपेक्षा ज्या पद्धतीने भारतीय सेलिब्रिटींनी व्यक्त केली तीच अपेक्षा गेली दोन अडीच महिने या सेलिब्रिटीजकडून शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात  एकही  ट्विट किंवा भूमिका मांडली नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. वास्तविक पाहता आपणही आंतरराष्ट्रीय  पातळीवर एखाद्या प्रश्नांवर आपण ज्यावेळी त्या घटनेचे समर्थन करतो त्यावेळी या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत नाही का? हा बाळबोध प्रश्न या सेलिब्रिटिजना पडलेला दिसत नाही. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या सार्वभौमत्वाचा आदर   करणे हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा गाभा असला तरीही  मानवतावादाचा आधार घेत आपणही अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाचे समर्थन करतोचना, त्यामुळे इतर राष्ट्रांचे सार्वभौमत्व धोक्यात येत नाही. त्यामुळे सार्वभौमत्वाचा नावाखाली प्रपोगंडा करण्याची एक चढाओढच आज समाज माध्यमाच्या माध्यमातून सेलिब्रिटीने केल्याचे दिसून येते. वास्तविकता सार्वभौमत्वाच्या संदर्भात कोणतेही राष्ट्र तडजोड करत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सरकार समोर जी संकट उभी राहिली त्या संकटाची पार्श्वभूमी पाहता ज्या सेलिब्रिटीजनी सार्वभौमत्वाचा आधार घेत जे काही ट्विट केले त्याची पार्श्वभूमी पाहिली तर  एका आंतरराष्ट्रीय पॉपस्टाअर्सने ट्विट केल्यानंतर यांची सार्वभौमत्वाची आणि अखंडत्वाची अस्मिता आपोआप कशी काय जागी होते हाच खरा प्रश्न आहे. गेले 75 दिवस या सेलिब्रिटिजना आणि भारतरत्नांना भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आलेली आहे हे समजलं नाही का? याचे उत्तर हे भारतरत्न आणि सेलिब्रिटीज देतील काय?या दोन्ही प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या विवेकाचा वापर न केल्यामुळे  ते देणार नाहीत. वास्तविक पाहता भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी हे जर स्वतःच्या विवेकाचा वापरच करत नसतील तर मग त्यांच्या भारतरत्नाला आणि सेलिब्रिटीतत्वाला कोणता अर्थ उरतो हे काही कोणत्या ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही.कारण या सेलिब्रिटिजना कोणीतरी ट्विट करायला लावले आहेत. तसेच सेलिब्रिटीजनी जे  ट्विट केले आहे त्याची  प्रिंटेड कॉपी  ही त्यांना पुरवण्यात आल्याचे  दिसून येते कारण या ट्विटमध्ये काही शब्दनशब्द हे  मोठ्या प्रमाणात सारखे आहेत, तर काही सेलिब्रिटीनी ट्विट भाजपच्या नेत्यांना टँग् केलेले आहे  त्यामुळे ह्या ट्विटवर शंका घेण्यास मोठा वाव निर्माण होतो. 

   म्हणूनच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली. वस्तुस्थिती पाहता अनेक सेलिब्रिटजनी  जे ट्विट केलं त्या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी   देण्याचे  स्पष्ट केल्याने.  लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.वास्तविक पाहता विरोधी पक्षाला जी गोष्ट अपेक्षित होती तीच गोष्ट राज्याच्या गृहमंत्र्याच्या आदेशामुळे झाल्यामुळे या प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्षाने उठवला त्यात नवल वाटण्यासारखे काही  ही नाही, म्हणजे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे ट्विटच्या प्रश्नांवर  खेळ  खेळ खेळणार व सर्वसामान्यांचे प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यातच विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांनी धन्यता मानलेली दिसते. 

    ट्विटच्या राजकारणाची वस्तुस्थिती लक्षात घेता जनतेची दिशाभूल करणाऱ्या कोणाचीही सरकार चौकशी करू शकते. त्यामुळेच सरकारने चौकशीचे आदेश दिले असल्याने सेलिब्रिटीच्या अस्तित्वाला काही अंशी तरी धक्का बसला ही वस्तुस्थिती आहे. तसेच ट्विटच्या या राजकारणापायी भारतरत्नाचीही चौकशी केली जाणार ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे राज्यात एक मोठे वादळ निर्माण झालेले आहे. वास्तविक पाहता भारतरत्न सारख्या व्यक्तीने सुद्धा कोणत्याही प्रश्नावर भाष्य करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करणं गरजेचं ठरतं पण या भारतरत्नांनी त्याचा दूरगामी विचारांचा विचार कुठेही केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता सेलिब्रिटीच्या व भारतरत्नांच्या फॉलॉवरसनी त्यांचा समाचार घेतल्यामुळे त्यांना ही त्यांची काहीतरी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले असेलच पण त्या चुकीची माफी मागण्याचा मोठेपणा हे लोक दाखवतील का हाच खरा प्रश्न आहे. वास्तविक पाहता कोण कुठली रिहांना पण तिच्या एकाच ट्विटमुळे भारतातील भारतरत्न आणि सेलिब्रिटीचे खरं रूप हे जगासमोर आण्यात ती यशस्वी झाली यात मात्र शंका नाही. वास्तविक पाहता सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे राज्यसभेचे खासदार होते त्यांनी आपल्या खासदार निधीतून अनेक एनजीओच्या मार्फत कामे केली ही वस्तुस्थिती आहे पण भारताच्या सार्वभौमत्वाच्या संदर्भात राज्यसभेत कधी प्रश्न विचारल्याचं ऐकवत नाही, त्यामुळे रिहाणाच्या एका ट्विटमुळे खरंच भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे का? हा प्रश्न सरकार ने सांगण्याच्याऐवजी सेलिब्रिटी आणि भारतरत्न का सांगतायात हाच खरा प्रश्न आहे. म्हणजेच  केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावरून कुठे ना कुठेतरी कमी पडते ही वस्तुस्थिती काही लपून राहत नाही. म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांना आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी ही जमात उदयास आली आहे असं म्हणावं लागतं. म्हणजेच या सरकारला  लोकांच्या हक्क अधिकाराच्या बाबतीत कोणत्याही संवेदना नाहीत. आपल्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत जागृत असलेले आंदोलनाच्या माध्यमातून आपले हक्क आणि कर्तव्य पदरात पाडून घेणाऱ्यांनाच आंदोलनजिवी म्हणणारे जर या देशात असतील तर खरंच या देशाची वाटचाल ही लोकशाही स्वरूपाची राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटीजनी जे काही ट्विटचा उद्योग  चालवला त्या उद्योगाचा बोलवता धनी हा कोणीतरी दुसरा असला पाहिजे ही वस्तुस्थिती काही लपून राहत नाही त्यामुळे केद्र सरकार भारतरत्नांना, सेलिब्रिटींना पुढे करून चर्चेपासून पळ काढुन भारतीय सार्वभौमत्वाच्या नावाखाली ट्विटर वाँर करण्यात यशस्वी झालेलं आहे. म्हणूनच  आज केंद्र सरकारचे नवे प्रवक्ते म्हणजेच भाट म्हणून आता सेलिब्रिटीकडे आपल्याला पाहावे लागत आहे. 


 ( लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)


No comments:

Post a Comment

मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...